
शिवभक्त सुरेश भोसले
@sureshbhosale
🚩रोजचे ऐतिहासिक शिवदिनवीशेष🚩📱📲8975379375
#🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय जिजाऊ #📜इतिहास शिवरायांचा
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ
⛳आजचे ऐतिहासिक शिवकालीन दिनविशेष⛳
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१६५९
अफजल वधानंतर केवळ १८ दिवसांत शिवाजी महाराजांनी पन्हाळ्गडसहित वाई ते कोल्हापूर पर्यंतचा मुलूख स्वराज्यात सामील. अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवरायांनी वाई सोडली आणि घोड्याच्या टापा वळाल्या थेट कराडच्या रोखाने. अफजलखानाला प्रतापगडावर मारल्यावर शिवरायांनी आदिलशाही भागात आक्रमण केले. ११ नोव्हेंबर १६५९ ला ते वाईला पोहोचले व नेताजीना भेटले . नेताजीना त्यांनी आदिलशाही भागात खोलवर जाऊन छापे घालण्यास सांगितले. नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे, कल्याणजी जाधव व सिद्दी हिलाल हे आदिलशाहीतून फुटलेले सरदार त्याना मिळाले. दख्खनच्या पठारावरुन दक्षिणेकडे जात त्यांनी वाटेतील आदिलशाही ठाणी जिंकून घेतली. चंदन-वंदन गडांना वेढा पडला. मग राजे खटाव, मायणी, अष्टी, मासूर, कऱ्हाड, सुपे, पाली, नेरले व अशी इतर गावे जिंकत कोल्हापूरला धडकले आणि आजच्या दिवशी पन्हाळगडसहित कोल्हापूर स्वराज्यात पुन्हा एकदा सामील झाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१६७९
मराठ्यांचे पाणी आणि रसद संपत आहे, तेव्हा ते कारण पुढे करून आपण तहासाठी घाई करावी व बेट मिळवण्याचा प्रयत्न करावा. या वेळीच २३ नोव्हेंबर रोजी सुरतेहून आलेले बंगाल मर्चट व "ऍने" ही जहाजे ताफ्यात सामील झाली. पैकी 'ऍने'चा उपयोग होणार होता. परंतु बंगाल मर्चट अत्यंत मोठे शिबाड असून त्याचा उपयोग तसा कमीच होता. मुंबईकरांनी २८ नोव्हेंबर रोजी पेशवा मोरोपंतांना पत्र लिहिले व बेट सोडण्याबाबत विचारले व त्यात इंग्रजांनी रसद पाण्याची परिस्थिती कळवली. तेव्हा मोरोपंतांनी आपण बेट कधीही सोडणार नाही व इंग्रजांना मिळालेली माहिती चुकीची असून आमचे सैन्य व्यवस्थित आहे व ते युद्धासाठी तयार आहे असे कळवले. याने इंग्रज आता अगदीच जेरीस आले आणि त्यांनी सुरतेला तहासाठी काय करावे, याचे विचार मागितले. तसेच त्यांनी सुरतेला कळवले की, वेढा असाच सुरू ठेवायचा असल्यास आम्हाला अधिक पैशांची गरज आहे व सध्या तरी ५००० शेराफिंस (१० शेराफिंस = १३ रुपये) त्वरित पाठवून द्यावे, जहाजांची संख्या वाढत असल्यामुळे खर्च वाढू लागला होता, परंतु यश मिळत नव्हते. सुरतकरही या प्रकरणाला वैतागले होते. त्यांनी तूर्त नाविक दल तसेच ठेवावे व कॅप्टन जॉन गोल्डबरो आणि कप्तान जॉन दानियाल (हे दोघे अनुक्रमे बंगाल मर्चट व 'ऐंने चे कर्णधार होते) यांना छ.शिवाजी महाराजांच्या मुलुखात हल्ला करण्यास पाठवावे, ज्याने त्याची शिबंदी इतर ठिकाणी विभागली जाईल व बेटाला पुरवठा खंडित होईल. या दरम्यान सुरतकर राजापूरकर इंग्रजांच्या मदतीने बेट राखून तह करण्याचा प्रयत्न करणार होते. दरम्यान १ डिसेंबर रोजी खांदेरीला मराठ्यांचा एक लहान मचवा काही रसद घेऊन गेला, सिद्धी व इंग्रज यांना तो अडवता आला नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१६८२
कल्याण भिवंडी ताब्यात आली तर मराठी मुलखात शिरणे सोपे जाईल या हेतूने औरंगजेबाने आपला मातब्बर सरदार हसनअलीखान याला १४ हजार सैन्यासह त्या भागात पाठवले होते. पण शंभुराजेंचे ध्येयनिष्ठ सरदार या हल्ल्याना समर्थपणे तोंड देत होते. कल्याण भिवंडीजवळच मेहंदळी गावात मराठ्यांनी मुघल ठाण्यांची लुटालूट केली होती. मुघल सरदार रणमस्तखान याला बहादूर खान ही पदवी मिळली होती. तो कल्याणला आला असताना मराठ्यांची ७ हजार स्वार व ८ हजार प्याद्यांची तुकडी कल्याण भिवंडीला गेली.ही बातमी कळताच खानही तिथे गेला व तिथे गढी तयार करून तिथले ठाणे त्याने मजबूत केले. तिथेच मराठ्यांच्या सैन्याची व रणमस्तखानाच्या सैन्याची लढाई झाली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१७२३
रोजी सरदार पिलाजीराव जाधव यांनी वसईच्या गव्हर्नरला पाठविलेल्या पत्राची नोंद!
"माझे स्वामी छत्रपती शाहू महाराज यांनी मला किल्ले वसई वर स्वारी करण्याकरिता पाठविले आहे. तरिही मी संयम करतो. तुम्ही तुमचा एक दुत वाटाघाटी करण्यासाठी आमच्या कडे पाठवावा". सरदार पिलाजीराव जाधव हे ज्येष्ठ आणि अनुभवी सरदार असल्याने त्यांनी वसई प्रांतावर परत जाणार होते, व म्हणून त्यांनी वाटाघाटीसाठी एकदा दुत पाठविण्याची सुचना एकदम हल्ला केला नाही. छत्रपती शाहू महाराज यांच्या मागण्या पोर्तुगिजांनी मान्य केल्यास वसईवर हल्ला न करता ते वसईच्या गव्हर्नरला केली होती. परंतु ती सुचना त्याने लक्षात घेतली नसल्याने सरदार पिलाजीराव जाधव यांना वसईवर स्वारी करणे भाग पडले. त्यांच्यानंतर सरदार दावलजी सोमवंशी यांच्याही फौजा, पोर्तुगिजांच्या अमलाखालच्या प्रदेशात घुसल्या.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१७५३
दाभाडे बंधु महाराष्ट्रात असल्याची संधी साधून अहमदाबादच्या जोरावरखा बाबी या मोगल ठाणेदाराने त्यांची ठाणी उठवली. दाभाडे बंधुंना हे कळल्यावर ते अहमदाबाद वर चाल करुन गेले, त्यांच्या सोबत त्यांच्या मातोश्री उमाबाई दाभाडे याही होत्या. अहमदाबाद जवळ उमाबाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या युध्दात दाभाडेंचा प्रचंड विजय झाला. अहमदाबादच्या रणभुमीवरील पराक्रमा बद्दल थोरल्या शाहू महाराजांनी उमाबाईंना सोन्याचे तोडे देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच हा सन्मान त्यांना वंशपरंपरागत करुन दिला. सोन्याचे तोडे पायात घालण्याचा मान फक्त छत्रपतींच्या घराण्यातील स्त्रियांना होता. असा मान मिळवणार्या सेनापती उमाबाई दाभाडे ह्या एकमेव महिला होतं. सेनापती उमाबाई दाभाडेंचा अल्पशा आजारपणाने तळेगाव येथे मृत्यु झाला महाराणी ताराराणी साहेब यांच्या नंतर मराठेशाहीतील नावाजलेल्या उमाबाई या पराक्रमी स्त्री होत्या. सेनापती उमाबाई दाभाडेंची समाधी तळेगाव दाभाडे पुणे येथे आहे. त्यांच्या मृत्युची तारीख २८ नोव्हेंबर १७५३.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २८ नोव्हेंबर इ.स.१७८०
ठाणे आणि कल्याण घेतल्यानंतर आता इंग्रजांची नजर वळली ती वसईवर, दि. १६ ऑक्टोबर रोजी कॅ. गॉडार्ड सुरतेहून मुंबईकरांच्या मदतीसाठी निघाला. दि. २८ नोव्हेंबर इ.स.१७८० रोजी गोडार्डन वसईला मोर्चे लावले. इंग्रजी तोफा वसईवर आग ओकू लागल्या. यावेळी वसईवर मराठ्यांचे किल्लेदार होते. विसाजीपंत लेले. इंग्रजांच्या या हल्ल्याला विसाजीपंतांनी दोन आठवड्यांपर्यंत चांगलाच प्रतिकार केला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#🚩जय जिजाऊ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २७ नोव्हेंबर इ.स.१००१
अफगाणिस्तानातून पुढे मुघलांची अनेक आक्रमणे येथे झाली. सबक्तगीन इ.स.९९७ मध्ये मृत्यू पावल्यानंतर खोरासान प्रांताचा सुभेदार म्हणून त्याचा मुलगा महमूद याने सुत्रे हातात घेतली. सामानींचे अधिपत्य झुगारून त्याने इ.स.९९९ मध्ये त्याने स्वतःला सुलतान म्हणून घोषित केले. नौशेटा आणि सिंधू यामधील प्रदेशात इ.स.१००१ मध्ये मोठी युद्धे झाली. त्यावेळी पेशावर येथे हिंदू राजा जयपाल यांनी महमुदला प्रतिबंध केला. २७ नोव्हेंबर इ.स.१००१ मध्ये झालेल्या युद्धात राजा जयपाल यांचा पराभव होऊन त्यांना बंदी बनविण्यात आले. त्याचा मुलगा आनंदपाल हा महमुद विरुद्ध उभा ठाकला. ज्या पठाणांनी यावेळी राजा जयपाल-आनंदपाल यांना मदत केली.त्यांना मोठ्या शिक्षा देऊन महमुदाने त्या सगळ्यांना इस्लामची शिक्षा दिली. हिंदू राजा जयपालचा पराभव झाला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६६७
(मार्गशीर्ष वद्य सप्तमी, शके १५८९, संवत्सर प्लवंग, बुधवार)
महाराज आणि पोर्तुगीजां मध्ये तह!
धर्मांध पोर्तुगीजांना कायमचा धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेशवर स्वारी करून गोवेकरांना चांगलीच अद्दल घडवली. जास्त नुकसान आणि हानी टाळण्यासाठी पोर्तुगीज व्हाईसरायने वकील पाठवून तहाची मागणी केली. महाराजांनीही सकोपंत काका यांना वकील म्हणून नामजाद करून व्हाईसरायकडे पाठवले. तहाची कलमे ठरवली. आजच्या दिवशी व्हाईसरायने तहाच्या तहनाम्यावर सही करुन तह पक्का केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६८०
मुंबईच्या इंग्रजांनी २७ नोव्हेंबर १६८० ला सुरतेस पत्र पाठवले.
छत्रपती संभाजी महाराजांना सिद्दीचा समाचार घ्यायचा होता त्यापुर्वी इंग्रजांना समज देणे गरजेचे होते म्हणून त्यांनी आपला वकील आवजी पंडित यांना २० नोव्हेंबर १६८० रोजी मुंबाईस पाठवले या वकिलाने इंग्रजांना कडकडीत शब्दात सुनावले ते मुंबईच्या इंग्रजांनी सुरतेस २७ नोव्हेंबर १६८० च्या पत्रात कळवले होते. “छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्दीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजाविरुध्द युध्द पुकारतील संभाजी राजांचा आलेला वकील पाहताच सिद्दीने आपले आरमार बंदराबाहेर नांगरले. छत्रपती संभाजी राजांच्या आरमाराला तोंड देण्याची तयारी नव्हती. सिद्दीचा कायमचा बंदोबस्त झाला नाही तर त्याच्या अमानुष लुटमारीच्या बंदोबस्तासाठी किनार्यावर सतत दहा हजार माणसे निष्कारण आडवावी लागतील संभाजीराजे इंग्रजांशी मैत्री ठेवण्यास तयार असले तर ते यापुढे हा उपद्रव सहन करणार नाहीत. सिद्दीची मदत ताबडतोब थांबवून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही आणि त्याची मदत चालूच राहीली तर छत्रपती संभाजी महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केला आह."
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २७ नोव्हेंबर इ.स.१६८१
सण १६७८ मध्ये शंभुराजे जेव्हा दिलेरखानाकडे गेले त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि एक बहिणही होती. पुढे शंभुराजेंनी विजापुरजवळ असताना शिवाजी महाराजांच्या मदतीने मुघलांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. पण यावेळी त्यांची पत्नी आणि बहीण मात्र मागेच राहिल्या. दिलेरखानाने त्यांना कैद करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले. महाराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजे गादीवर आल्यानंतर त्यांनी पत्नीला व बहिणीला सोडवण्यासाठी नगरच्या किल्ल्यावर हल्ले सुरू केले. शंभुराजेंचे सैन्य नगरच्या किल्ल्याजवळ जाऊन किल्ल्यात घुसण्याची संधी शोधत होते. पण मुघल किल्लेदाराकडे मराठ्यांशी टक्कर देऊ शकेल इतके सैन्यबळ नव्हते. त्यामुळे तो हैराण झाला होता. त्याने आपली स्थिती रहुल्लाखानाला कळवल्यावर त्याच्या मदतीसाठी आज्जमशहा आणि मूनव्वर खान यांना नेमण्यात आले.आणि मूनव्वर खान यांना नेमण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २७ नोव्हेंबर इ.स.१८९०
महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन!
शके १८१२ च्या कार्तिक व. १ रोजीं महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक व स्वयंस्फूर्तीने समतावाद प्रतिपादिणारे महात्मा ज्योतिबा गोविंद फुले यांचे निधन झाले.
सातारा जिल्ह्यांतील कटगुण हे यांचे मूळ गाव. यांचे आजोबा शेटीबा हे उदर- निर्वाहासाठी म्हणून पुण्यास आले. यांच्या तीनही मुलानी माळी कामांत कौशल्य दाखवून पेशव्यांच्या येथे फुले देण्याच्या कामगिरीत लौकिक संपादन केला, म्हणून यांचे नांव फुले असे पडले. शिक्षणास सुरुवात झाल्यावर ज्योतिबांनी वा.ब.फडके यांचे मांग जातीचे गुरु लहूजीबुवा यांचेजवळ दांडपट्टा व नेमबाजी यांचे शिक्षण घेतले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या सेवावृत्तीने व कार्यनिष्ठेनें हे चांगलेच भारावले गेले होते. बहुजन समाजाला साक्षर करावे व त्याला सत्यधर्माचे ज्ञान करून द्यावे असा विचार यांच्या मनांत येऊ लागला. सन १८५१ मध्ये यांनी बुधवार पेठेतलि चिपळुणकरांच्या वाड्यांत मुलींची शाळा काढली. या कामी यांना व यांच्या पत्नींना समाजाकडून अत्यंत त्रास झाला; परंतु यांच्या या अभिनव कार्याबद्दल यांचा जाहीर सत्कार झाला. व सरकारने यांना दोनशे रुपयांची शालजोडी अर्पण केली. त्यानंतर सन १८५३ मध्ये वेताळ पेठेत अस्पृश्यांकरिता दोन शाळा यांनी स्वतःच्या खर्चाने काढल्या. विधवाविवाहाचा प्रसार करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी तसा एक विवाह घडवून ही आणला. तसेच पतित मुलींच्या हातून भ्रूणहत्येचे पातक घडू नये म्हणून यांनी बालहत्या-प्रतिबंधक गृह काढले. यानंतरची यांची महत्वाची कामगिरी म्हणजे १८७३ मध्ये यांनी आपल्या विख्यात अशा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणांची मध्यस्थी दूर होऊन सामाजिक गुलामगिरी दूर व्हावी असा उद्देश या समाजाचा होता. समाजशास्त्राज्ञांनी अभ्यासपूर्वक जे सिद्धान्त शोधून काढले ते यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिपादिले. ब्राह्मण व वेदपुराणादि ग्रंथांवर प्रखर हल्ला करून सबंध समाजरचनाच बदलून टाकण्याची दिशा यांनी दाखविली. 'ब्राह्मणांचे कसब', 'गुलामगिरी', 'जातिभेदविवेकसार', इशारा', 'शेतक-्याचा आसूड' वैगे पुस्तकें यांनीं लिहिलीं आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६६४
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण भिवंडी जिंकून कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराची स्थापना केली.पुढच्या काळात या आरमाराने परकीय सत्ताना समर्थपणे टक्कर देऊ शकेल अशी प्रगती केली होती.महाराजांच्या वाढत्या आरमारी सामर्थ्याने त्याकाळी अनेक अफवा पसरत होत्या.फेब्रुवारी १६६५ मध्ये शिवाजी महाराजांनी प्रथमच आरमारी जहाजातून प्रवास करत बसरूर वर स्वारी केली होती.पण त्यापूर्वीच इंग्रजांच्या पत्रातून महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडत होते.ते असे,"शिवाजी विजयी आणि अनिर्बंध असून त्याचे सामर्थ्य रोज वाढत असल्याने सभोवतालीच्या राजांना त्याची मोठी दहशत वाटते.त्याने आता ८० जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठवली आहेत आणि स्वतः खुष्कीच्या मार्गाने जाऊन त्यांना मिळावे असा त्याचा बेत आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६७०
जंजिऱ्याचे बंड फेब्रुवारी १६७१ मध्ये झाले. त्यापूर्वी थोडे दिवस अगोदर नोव्हेंबर १६७० मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या उत्तरेकडे १०० मैलावर नागाव येथे १६० लहान जहाजे, १०,००० घोडेस्वार व २०,००० पायदळाचे सैनिक जंजिऱ्याला वेढा घालण्याचा पूर्ण तयारीनिशी एकत्र जमवले होते. कुदळी, फावडी, पहारी यांसारखी खाणकामाची कित्येक हत्यारेही त्यांच्याजवळ होती. २४ नोव्हेंबर रोजी आरमाराच्या ह्या तुकडीने नागाव सोडले आणि २६ नोव्हेंबर रोजी ही तुकडी माहीला आली. त्याच दिशेने मराठ्यांच्या सैन्यानेदेखील जमिनीवरून कूच केले. परंतु २६ नोव्हेंबरला महाराज अचानक माघारी वळले आणि आपल्या आरमारासही त्यांनी परत बोलावले. कारण यावेळी बागलाण काबीज करण्यासाठी सैन्यबळ हवे होते. ह्या सुमारास मराठयांचे सैन्य नाशिक आणि बागलाणात मोगल सुभेदाराशी निकाराने सामना करण्यासाठी व्यस्त असल्याने इकडे मराठयांच्या गैरहजेरीत संधी साधून सिद्धी कासीमने दंडा राजपुरीचा परिसरातील सात किल्ले जिंकून (१६७१) घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६७९
मराठ्यांचा खांदेरी बेटावरील एक मुसलमान सैनिक सिद्द्याने फितवून नेला व त्याकडून सिद्दीने बरीचशी माहिती मिळवली. सिद्द्याने ही माहिती केग्वीनला दिली व हल्ल्याची तयारी करण्याविषयी सांगितले. याबाबत केग्विनने मुंबईला कळवलेला वृत्तांत असा होता. -
“सिद्दी आपले पठाण घेवून उतरल्यास आपले बेट जाईल असे म्हटल्यामुळे मराठे त्यावर चिडले आणि मराठ्यांनी त्याला कडक शिक्षा देवू असे सांगितल्यामुळे तो घाबरला आणि सिद्दीला जाऊन मिळाला असे त्या इसमाने सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार मराठ्यांकडे सुमारे ६ खंडी (१३६० किलो) बंदुकीची दारू, १००० तोफगोळे, १२ तोफा, ३०० तलवारबाज व २०० बंदुकधारी आहेत. खांदेरीवर ४ विहिरी असून त्यावरील पाणी अत्यंत कमी आहे, इतके की ते पाण्यात उतरून ओंजळीने पाणी भरतात. शिबंदी बेट सोडायला तयार आहे परंतु मायनाकने त्यांना दम भरला आहे की ‘हे शिवाजी महाराजांचे काम आहे आणि किल्ला पूर्ण होण्या आधी जर कुणी बेट सोडेल तर मायनाक बायका-मुलांसह सर्वांची डोकी मारीन’ आणि त्यामुळे सर्व लोक भयभीत आहेत. शिबंदी बरीचशी आजारी आहे तसेच दौलतखान ८ गलबत भरून रसद तयार ठेवून असुन तो लवकरच ते सामान बेटावर पुरवणार आहे”
मराठ्यांची माहिती मिळाल्यावर सिद्दीने स्वतःचा डाव आखला आणि त्याने इंग्रजांना सांगितले की माझ्या आरमारातील बरीच गलबते अजून सुरतेहून येत असून त्यात बरीचशी लहान गलबते आहेत. मराठे खाडीतून निघून ज्यावेळी बेटाला पुरवठा करतील तेव्हा त्यांना न अडवता जाऊ द्यावे व इंग्रजांनी मोठी गलबते घेवून त्यांचा पाठलाग करावा त्यावेळी मी माझी लहान गलबते माणसांनी भरून त्वरेने दुसऱ्या बाजूने येईन आणि माणसे बेटावर उतरविन. त्यानंतर तुम्ही देखील शक्य तेवढे सैन्य बेटावर आणण्याचा प्रयत्न करा आणि दरम्यान मराठ्यांच्या नौकांना थोपवून धरा. माझे सैन्य बेटावरील शिबंदी कापून काढेल आणि बेटावर झेंडा लावेल मग आपण आपले सर्व सैन्य बेटावर आणावे. हा डाव इंग्रजांना नकोसा होता कारण याने बेट आयतेच सिद्दीला मिळणार होते आणि इंग्रजांना ज्याप्रमाणे मराठे मुंबईच्या जवळ नको होते त्याप्रमाणे त्यांना हा जंगली सिद्दी देखील नको होता. म्हणून केग्विनने मुंबईला अनुकूल तह करावा असा पाठपुरावा मुंबईला केला. यादरम्यान सिद्दीने आपली जवळ जवळ १००० माणसे उंदेरी बेटावर उतरविली आणि तिथे किल्ला बांधण्यास सुरुवात केली. २६ जानेवारी च्या पहाटे दौलतखान आपले संपूर्ण आरमार घेवून उन्देरीवर चालून आला व मोठे युद्ध सुरु झाले याच दरम्यान रसदेने भरलेल्या २० होड्या खांदेरीला गेल्या. इंग्रज आणि मराठे यांचे वकील तहासाठी बराच कथला करीत होते आणि उभाय्पाक्षांना मान्य होईल अशी तहाची कलमे करण्यात ते व्यस्त होते. शिवाजीराजांच्या वतीने चौलचा सुभेदार हे प्रकरण सांभाळीत होता. त्याच्या सोबत सुरनवीस अण्णाजी दत्तो यांना पाठवण्यात आले होते. इंग्रजातर्फे राम शेणवी दुभाषी व मध्यस्थीचे काम करीत होता व निर्णय मुंबई व सुरत दोन्हीकडील अधिकारी मिळून घेत होते. दिनांक २८ जानेवारीला उभय पक्षांना यश आले आणि तहाची कलमे ठरली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६८३
छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांचे युद्ध चालू होते पोर्तुगीजांपाशी सैन्य कमी होते अशा परिस्तिथीत दरवर्षी पोर्तुगालला गलबत पाठवायचे की नाही नाही, त्यासंबंधी ठराव आज च्या दिवशी व्हाइसरॉय ने आज राज्य सल्लागार कडे मांडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ नोव्हेंबर इ.स.१६८३
छत्रपती संभाजी महाराजांनी गोवा मोहीम आवरती घेतली
पुन्हा मोठा पराभव पत्करून, पळ काढीत, व्हाईसरॉय गोव्यात आला, त्यासमयी राजधानीची परिस्थिती अशी झाली होती, ह्याचे सुरेख वर्णन, पोर्तुगीज कागदपत्रांच्या आधारे सरदेसाई यांनी केले आहे, सरदेसाई म्हणतात, "इकडे व्हाईसरॉयने जुवे बेटातून पळून शहरात प्रवेश केला, तेव्हा शहरात सर्वत्र घबराट माजल्याचे त्याला आढळून आले, सैनिकांचा धीर प्रचंड खचला होता, ते मराठ्यांशी लढण्याच्या मनस्थितीत नव्हते, ते पाहताच व्हाईसरॉयही गर्भगळीत झाला. खाडीला पाणी खूप प्रमाणात वाढले होते, पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी तेथूनच दि.२६ नोव्हेंबर १६८३ ला परत फिरले. पुढे खरतर गोवा घेण्याचा बेत होता, परंतु शहा आलम कोकणातून गोव्याच्या दिशेने चालून येत होता , त्यामूळे राजांना मोहीम आवरून येणे बंधनकारक होते , आणि पुढे मराठा - पोर्तुगीज यांमध्ये तह झाला
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २६ नोव्हेंबर इ.स.१७३८
चिमाजी अप्पा वसई मोहिमेवर निघाले
वसईचा किल्ला म्हणजे स्थानिक तथा आसपासच्या परिसरातील हिंदूंचे धर्मांतरण करण्याचा अड्डा बनला होता. येथील पोर्तुगीज ख्रिश्चन मिशनरी वेगळीच खेळी खेळत होते. प्रत्यक्ष युध्द न करता वसई प्रांतातील हिंदू समाजातील कोळी, भंडारी, आगरी, कुणबी, ब्राह्मण, महार, मांग आदी लोकांना पकडून वसईच्या किल्यात आणून त्यांचे धर्मांतरण करण्यासाठी अनन्वित छळ करीत. धर्मांतरण झाले ख्रिश्चन धर्म स्विकारला की सोडून देत. अशाप्रकारे जबरदस्तीने धर्मप्रसार करून राज्य विस्तार करण्याचा पोर्तुगीजांचा डाव होता. ह्या सर्व गोष्टींनी परिसीमा गाठली होती. यासंबधी अणजूरकर नाईक मंडळींनी पेशवे दरबारात वारंवार पोर्तुगीजांबद्दल तक्रार केली होती. परंतु उत्तरेकडील राजकारणाच्या धामधुमीत वसई मोहीम लांबत होती.
उत्तरेकडील राजकारणातून किंचित उसंत मिळताच चिमाजीअप्पांनी पोर्तुगीज गव्हर्नरला जबरदस्त दम देणारा खरमरीत निरोप पाठवला. तो असा - "जर तुमचे हे धर्मांतराचे प्रकार थांबले नाहीत, तर मराठे थेट किल्यात घुसतील. मग तुमच्या चर्चच्या घंटानादाचे ध्वनी आमच्या देवळात गुंजतील."
हा निरोपवजा दम सत्तेच्या मदमस्त माजात पोर्तुगीज गव्हर्नरने दुर्लक्षित केला. परिणामी अवघ्या काही काळात मराठ्यांनी फिरंग्यांना असा काही मराठी हिसका दिला की वसईच काय जवळपास संपूर्ण उत्तर फिरंगाणातून पोर्तुगीजांना अल्पावधीतच गाशा गुंडाळून गोव्यास पळावे लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय जिजाऊ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २५ नोव्हेंबर इ.स.१६५४
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे उमाजीराजे संभाजीराजे भोसले यांचा जन्म
शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याचे थोरलेसंभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र, उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे पुत्र.
शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचे होते.
उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती.
ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो.
उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. त्यांचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे.
मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे.
उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
📜 २५ नोव्हेंबर इ.स.१६५९
अफझलखान वधाची बातमी विजापूरास समजताच साऱ्या शहरात खळबळ, गोंधळ आणि रडारड सुरू झाली. दुःखात शहर बुडाले. अली आदिलशहाने नौबत बंद केली. अफझलखानाबरोबर असलेले फाझलखान, मुसेखान, अंकुशखान वगैरे मंडळी विजापुरा येऊन पोहोचली. अफझलखानाचा मुलगा फाझलखान यास सर्वात जास्त दुःख झाले. तो मोठ्या दुःखाने खाली मान घालून विजापूरच्या सुलतानास भेटावयास गेला. त्यानंतर तीन दिवसांनी विजापुरात बातमी पसरली की शिवाजीराजे फौजेसह कोल्हापूरकडे दौडत सुटले आहेत. त्यांनी वाईपासून कऱ्हाडपर्यंतचा सर्व मुलूख आपल्या कबजात आणिला. त्यानंतर राजियांनी सुपे, तांबे, पाली, नेरले, कामेरी, विसापूर, सावे, उरण, कोळे हा संबंध मुलूख घेतला. खानाच्या वधानंतर अवघ्या तेरा दिवसात राजेयांनी गरूड भरारी मारली आणि ते दिनांक २५ नोव्हेंबर १६५९ रोजी कोल्हापुरात घुसले.' कोल्हापूर जिंकले. त्यानंतर राजियांची दृष्टी पन्हाळगडाकडे वळली. पन्हाळा तेथून अवघा पाच कोस होता आणि तो विजापूरकरांच्या ताब्यात होता. ह्याचवेळी शिवाजीराजांचा सरनौबत नेताजी पालकर याने गदग, तिकोटे, हुकेरी, गोकाक ही ठाणी लुटली. लक्ष्मेश्वर लुटून तो विजापुरात घुसणार अशा बातम्या विजापुरात पसरल्या. पण ह्यावेळी शिवाजीराजांनी पन्हाळ्यास वेढा घातला ही बातमी अली आदिलशहास विजापुरात पोचली. याचवेळी नेताजी पालकर लक्ष्मेश्वरपर्यंतची प्रचंड लूट घेऊन कोल्हापुरात दाखल झाला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २५ नोव्हेंबर इ.स.१६८३
छत्रपति संभाजी राजांनी पोर्तुगीज विरोधी गोवा स्वारीत कुंभारजुव्याचा किल्ला जिंकला. मराठ्यांच्या तोफांच्या आवाजाने गोव्यातले लोक आणि शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन पादरीही शहराच्या तटबंदीकडे पळत सुटले! ४०० लोकांनिशी विजरेई २५ नोव्हेंबरला जुवे बेटावर आला. जवळच्या टेकडीवर जाईपर्यंत त्यातले ३०० लोक जिवंत राहिले होते. टेकडीवरचे मराठे माघारी फिरले आणि थोड्याच वेळात मराठ्यांच्या नव्या तुकडीचे घोंगावणारे वादळ फिरंग्यांवर येऊन कोसळले सर्वत्र अंदाधुंदी माजली. व्हाइसरॉय फक्त माघार घ्यायला सांगत होता पण धीर खचलेले सैन्य सैरावैरा पळत सुटले पण शंभूराजांच्या रौद्र तांडवामुळे व्हाइसरॉयचे धाबे दणाणले. हे बेट विजरेई आल्व्हारोचा पराभव करुन मराठ्यांनी काबीज केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २५ नोव्हेंबर इ.स.१७४०
पोर्तुगीजांचा मराठ्यांबरोबर तह
फेब्रुवारी १७३९ मधे गोव्याजवळ आले होते व्हॉईसरॉयने रेवदंडा डच सत्तेला देण्यास कबूल केले व मराठ्यांविरुद्ध मदत मागितली पण डचांनी नकार दिला. मानाजी आंग्रे यांनी २३ फेब्रुवारी १७३९ रोजी रेवदांड्यावर झडप घातली मोर्चे लावले ते पोर्तुगीजांना भारी पडले व उडवून लावले पण मानाजी आंग्रे ह्यांनी जिद्द काही सोडली नाही उलट एप्रिल १७३७ मधे रेवदांडा पडकोट जिंकला व स्वराज्यात आणला आणि मराठ्यांचे वर्चस्व चालू ठेवले हे बघून पोर्तुगीज सत्ता कमजोर झाली व त्यांनी पार वसईच्या शरणागती नतंर हयातीत ठेवलेले किल्ले होते फक्त दिव दमण...
.
२५ नोव्हेंबर १७४० रोजी तहानुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांना कुंकळली व असोळणे हि साष्टीतील दोन गावे दिली आणि त्याबद्दल पोर्तुगीजांकडून रेवदांडा कोट ( चौल ) व कोरलाई किल्ला ( castle curlew ) हे समोरा समोर चे दोन किल्ले स्वराज्यात परत शामिल करून घेतले...
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २५ नोव्हेंबर इ.स.१७९०
अजमेरबरोबर पुष्कर तीर्थसुद्धा महादजीबाबांच्या ताब्यात आले. तेथे त्यांनी लाखो रुपये धर्म करून मोठे देवालय बांधिले. जिंकलेल्या मुलखाचा कारभार लखबादादाकडे सोपविला. जोधपूरप्रमाणे जयपूरचा मामलाही सन १७९० अखेर उरकला. प्रतापसिंगाने पूर्वीच्या मागणीप्रमाणे खंडणी कबूल करून आपला बचाव केला. विजयसिंगाने पुढे महादजीबावांविरुद्ध हालचाल केली नाही. अलवारचा प्रतापसिंग माचेडीकर दिनांक २५ नोव्हेंबर १७९० रोजी मरण पावला. हा बावांचा दोस्त होता. म्हणून त्याचा मुलगा वखावरसिंगास बावानी समाधानाची पत्रे व सरफराजीची वस्रे पाठविली. अलवारचा प्रांत हा खरा जयपूरकरांचा प्रांत. तो पुन्हा जयपूरकरानी हस्तगत करू नये अशी तजवीज महादजीबावानी करून ठेविली. अलवार, धोलपूर व थोडे बहुत भरतपूर ही राज्ये महादजीबावांच्या कर्तृत्वाने आकार घेती झाली. हे इतिहासास विसरता येणार नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय जिजाऊ #🚩शिवराय
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय जिजाऊ
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २४ नोव्हेंबर इ.स.१६७२
आदिलशाहीचा प्रमुख अली आदिलशहा दिनांक २४ नोव्हेंबर १६७२ रोजी निधन पावला. त्यानंतर चार वर्षांच्या शिकंदर आदिलशहास सुलतान करण्यात आले. आदिलशाही कारभार वजीर खवासखान पाहू लागला. त्यास पठाण बहलोल खानाने दिनांक ११ नोव्हेंबर १६७५ रोजी कैद केले आणि जानेवारी १६७६ त त्यास ठार करून सर्व सत्ता आपल्या हातात घेतली. खवास खानाने नेमलेल्या सर्व दक्षिणी लोकांना काढून बहलोल खानाने राज्यांत पठाणांचा भरणा केला. शिकंदर बादशहा लहान होता त्यामुळे त्यास पठाण बहलोल खानाच्या तंत्राने वागणे भाग पडले. ह्या वेळी दरबारात दोन पक्ष निर्माण होऊन त्यात स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे उत्तरेकडील मोगलांना दक्षिणेस पाय रोवण्यास संधी मिळाली त्याचा फायदा मुघली सरदार बहादूर खान याने घेऊन विजापुरवर स्वारी केली. यावेळी दख्खन दक्षिणी राज्याकरिता आहे. करिता दक्षिणची पातशाही आम्हा दक्षिणियांच्या हातात राहील ते करावे. उत्तरेकडील मुघलांचा हात इकडे शिरकू नये हे दूरदर्शीपणाचे धोरण शिवाजी महाराज कुतुबशाहीचा सुलतान अबुल हसन यांच्यात ठरले होते. त्याप्रमाणे दक्षिणेतील दोन शाह्या व मराठी सत्ता ह्यांच्यात वरीलप्रमाणे तह झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ नोव्हेंबर इ.स.१६८३
!! शंभू ने सुरु केले तांडव रुद्राचे तांडव !!
"छत्रपति शंभूराजे" केवळ ४० मराठे सैन्यासह स्टीफन उर्फ जुवे बेटावर उतरले.
मराठ्यांच्या तोफांच्या आवाजाने गोव्यातील लोक व शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन लोक "पादरी" शहराच्या तटबंदीकडे पळत सुटले. ४०० फिरंग्यांपैकी ३०० जण जवळच्या टेकडीपर्यंत जाईपर्यंत जिवंत राहिले. टेकडीवरचे मराठे मागे फिरले व थोड्याच वेळात मराठ्यांची नवी तुकडी फिरंग्यांवर तुटून पडली. सर्वत्र अंदाधुंदी माजली. धीर खचलेले फिरंगी सैन्य सैरावैरा पळत सुटले. ४ मराठा घोडेस्वारांनी फिरंगी व्हाइसरॉय चा पाठलाग सुरु केला पण त्यांच्या तावडीतून तो जखमी होऊन वाचला आणि कसाबसा खाडीपर्यंत जाऊन पोचला. त्याला व कॅप्टनला एका जहाजात बसून पळून जाताना "शंभूराजे" नी पहिले व संतापाने बेभान झालेल्या शंभूराजेंनी त्यांचा पाठलाग करण्यासाठी आपला घोडा पाण्यात घातला. "खंडोबल्लाळ चिटणीस" यांनी पाण्यात उडी मारून राजांना आडवले आणि राजांचा घोडा तीरावर आणला. शंभूराजेंच्या या रौद्र तांडवामुळे व्हाइसरॉय चे आणि फिरांग्यांचे धाबे दणाणले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ नोव्हेंबर इ.स.१६९९
स्वत: औरंगजेब बादशहा दख्खन काबीज करण्यासाठी प्रचंड फौजेनिशी आला व आजच्या दिवशी २४ नोव्हेंबर १६९९ रोजी त्याने साताऱ्यातील "किल्ले वसंतगड" ताब्यात घेतला व नंतर त्याचे नामकरण "किली-द-फतेह" केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*







