( मन प्रफुल्लित करणारा लेख...)
*....त्या शिवाय " पोरगी दाखवायचा कार्यक्रम " होऊच शकत नव्हता !*
🙄 🫣 🤓 🤫 🥰
आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबातच नव्हतं!
ABCD ....... XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर, ते ही इंग्रजीच्या तासालाच! आणि आता ABP माझा, CID, MRI, X-ray, Blood, Star TV, Z-TV विचारूच नका .
आमच्या लहानपणी , *This is Gopal. आणि That is Seeta .*
ही दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायचे तरी घरी जबरदस्त कौतुक व्हायचं!
आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची.
आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की, त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं !
अहो कंडक्टर याच्यामुळे की, आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने विचारले, हं ss काय रे बाळा, मोठेपणी तू काय होणार?
असा प्रश्न विचारला की ते पोट्टं हमखास म्हणायचं: मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार !
तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळाले असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं.
फक्त एवढंच विचारायचे ....
*पहिल्या झटक्यात पास झालास ना ?*
आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गांवाला आनंद व्हायचा !
म्हणजे पहा सुखाच्या, आनंदाच्या, मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या !
*लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो, त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं.*
तुम्ही बघा पूर्वी.. गाव छोटं, घर छोटं, घरात वस्तू कमी, पगार कमी, त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी.
उसनंपासनं केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता, *तरीही मजा खूप होती!*
*तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !*
उसनंपासनं करावंच लागायचं ...
साखर, चायपत्ती, गोडेतेल, कणिक, कोथिंबीर, मिरची या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता.
त्यामुळे कोणाकडे "हात पसरणे" म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही .
उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टींचा "कमीपणा" वाटत नव्हता !
डोकं दुखल्यावर *शेजाऱ्याकडे "अमृतांजनचं एक बोट" उसन मागायला सुद्धा* अजिबात लाज वाटली नाही.
घरातल्या वडील माणसासाठी १० पैश्याच्या तीन बिड्या किंवा १५ पैशाचा तंबाखूचा पुडा आणतानाही मान कशी ताठ असायची !
कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !
गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती,
कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट, चमचे, बेडशीट, तक्के, उषा, दांडी असलेले कप आदी साहित्य मागून आणल्या शिवाय "पोरगी दाखवायचा कार्यक्रम" होऊच शकत नव्हता !
*आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती, ते आत्ता कळतंय !*
आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही !
जेंव्हा *Status वर* डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं, अरे लग्न झालं वाटतं !
हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे.
भेटत रहा, बोलत रहा , जाणे-येणे ठेवा, विचारपूस करा ..
जेवलास का ?
झोपलास का ?
काही दुखतंय का ?
असे प्रश्न विचारतांना लागलेला मायेचा, काळजीचा, आपुलकीचा कोमल स्वरच जगण्याचं बळ देत असतो !
माणसा शिवाय, गाठीभेटी शिवाय, संवादा शिवाय कांssही खरं नाही !
------🙏 ^^^^^ 🙏------
मला वाटत वरील गोड आठवणीशी तुम्ही नक्कीच सहमत असाल.
काल माझ्या वाचनात एक पुस्तक आलं, त्यात असे लिहिले होते की, जर तुम्ही बालपणीच्या रम्य गोड आठवणी सतत आठवू लागल्या त्यात रममाण होऊ लागलात तर तुमचं वयस्कर होण्याची प्रक्रियेवर परिणाम न होता तुम्ही वयाने कमी दिसू लागता.
तरुण दिसू लागता..
*चला तर सुरुवात करू या आणि जाऊ त्या सुंदर जगात भूतकाळात....* #🎑जीवन प्रवास #🙂Positive Thought #💭माझे विचार #🙂माणुसकीच नात #☺️सकारात्मक विचार