Mr. Vik@s
ShareChat
click to see wallet page
@36832142
36832142
Mr. Vik@s
@36832142
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🌹देवी देवता🙏 एकदा भगवान विष्णूंनी ठरविले की, आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करावयाच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य तर कोणी वैभव मागत होते. विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिले की, हळूहळू विष्णूचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे? सस्मित चेहर्याने विष्णूंनी उत्तर दिले, 'तू अजिबात चिंता करू नकोस. मजजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर या पैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस.' लक्ष्मीने विचारले, 'सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे. माझ्या तर काही लक्षात येत नाही.' विष्णू म्हणाले, 'तिचं नाव आहे शांती' जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे. Facebook साभार
🌹देवी देवता🙏 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 गेलो आणि देवासमोर जाताच मांडी ठोकून बसलो . काढली वही बॅगेतून . बापू म्हणाले ,अहो आचार्य ,काय करताय ? म्हणालो अहो ,मला येताना दोनशे चौतीस जणांनी सांगितले आहे कि आमचा नमस्कार सांगा . मी सांगतोय महाराजांना . वाचता वाचता दम लागला इतकी नाव होती ,बापूंसहित अनेकांनी हे पाहून डोक्याला हात लावला . प्रसादालयात गेलो आणि ताट समोर ठेवताच हाती फोन घेतला ,समोरच्या रांगेतील काही जण, हा काय प्रकार ? या आविर्भावात पाहू लागले . त्यांना उद्देशून म्हणालो ,अहो प्रसादाच्या ताटाचा फोटो फेसबुकवर पाठवायचा आहे . तसं शास्त्र असत . दोनदा रांग लाऊन तट्ट होत मी बाहेर आलो . तितक्यात एक प्रसिद्ध व्यक्ती मला दिसली ,धावत जाऊन त्यांना गाठले आणि बकोटी पकडून म्हणालो दादा ,एक सेल्फी ,प्लिज नाही म्हणू नका . अगदी नाईलाजाने त्यांनी हो म्हटले . सेल्फी काढताना म्हणालो ,अहो दोन बोटं दाखवा कि ,त्यांनी विचारले का हो ? यावर मी म्हणालो ,शास्त्र असतंय तस ,अगदी वैतागून त्यांनी बोटे दाखवली आणि कृतकृत्य होत मी सेल्फी घेतली . जरा घाटावर विसावलो तो समोर एक बोट दिसली ,तिथे फलक होता --नौका विहार . म्हटलं ,फोटो तो बनता हि है l पायऱ्या उतरून पुढे जात मी दोघांना पकडत म्हणालो ,मी बोटीत बसताना एक फोटो काढा . हे ऐकून नौका हाकणारा मनुष्य म्हणाला ,अहो ,एव्हढ्यात नाही जाणार . मी म्हणालो मला जायचं नाहीये ,फक्त बोटीत टेकतांना फोटो हावाय .--- काय माणसं असतात ? अशा आविर्भावात त्याने पाहिलं मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी फोटोसेशन उरकले . आसपास काय काय प्रसिद्ध आहे ? पुजारी काकांना विचारताच ते म्हणाले ,अरे वाह ,अहो आचार्य या खेपेस दौरा मोठा दिसतोय ,त्यांना थांबवत म्हणालो ,अहो काका ,मला फक्त माहिती द्यायची आहे ,मी उद्या लगेच निघणार आहे . एक छान पोस्ट तयार होत असल्याच्या आनंदात मी निद्राधीन झालो . उद्या सकाळी माझी पोस्ट पहालच ,लाईक करायला विसरू नका ---श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 हि अलर्काची आई .अलर्काला राज्याभिषेक झाल्यावर आई वानप्रस्थात चालल्याचे पाहून अलर्काला फार वाईट वाटले . हे पाहून मदालसा म्हणाली ,सदा एकत्र सहवास l न घडे नित्य जीवास l कर्माधीन खास l असे निवास जाण बा ll अलर्का अरे कायम एकत्र राहणे शक्य नाही ,आपापल्या कर्माप्रमाणे जाणे येणे होत असते . मात्र निघताना मदालसेने अलर्काला भविष्याबाबत सावध केले आणि वानप्रस्थाला जाताना तिने अलर्काला एक बंदिस्त पेटी@ दिली ,जाताना ती म्हणाली अलर्का, धर्माने राज्य करून पुत्राप्रमाणे प्रजेचे पालन कर . सहासष्ठ हजार वर्षे राज्य केल्यावर तुझ्यावर शत्रूचे आक्रमण होईल त्यावेळी हे पेटीतील लिखित काढून वाच . ते वाचून त्याप्रमाणे आचरण केल्यास शत्रू मित्र होतील आणि साम्राज्य मिळून सुखी होशील . पुढे आईने सांगितल्याप्रमाणे सहासष्ठ हजार वर्षांनंतर शत्रूचे आक्रमण झाले आणि राजधानी शत्रू हाती गेल्यावर अत्यंत दुःखाने रात्री अलर्क घोड्यावर बसून निघून गेला . त्या वेळी त्याला आईने दिलेल्या पेटीची आणि भविष्य सांगितल्याची आठवण झाली . आपल्या आईला आपला भविष्यकाळ माहीत होता हे पाहून त्याला अत्यंत आश्चर्य वाटले . प्रातःकाळी ती पेटी काढून त्याचे पूजन करून आत पाहताच त्यात एक लिखित होते आणि त्यावर दोन श्लोक लिहिले होते . त्याज्यः सर्वात्मना संगः स चेत्त्यक्तुं न शक्यते ll सद्भिः सह स कर्तव्यः संतो दुःसंगभेषजम् ll कामः सर्वात्मना हेयो हातुं चेच्छक्यते न सः ll मुमुक्षां प्रति कर्तव्यः सैव कामार्तिभेषजम् ll याचा अर्थ थोरल्या महाराजांनी असा सांगितला आहे , संग सोडावा सर्वथा l हे न घडे तत्त्वता l तरी साधूचा संग धरीता l भवव्यथा नासेल ll टाकावा सर्वथा काम l हे न करवे जरी काम l मुमुक्षेचा करावा काम l मिळेल धाम अनायासे ll कोणाचाही संग करू नये मात्र हे न जमल्यास साधूचा संग करावा ,पुढील श्लोकात काम हा शब्द इच्छा किंवा आशा या अर्थी वापरला आहे . कशाचीही इच्छा असू नये मात्र हे न जमल्यास मुमुक्षेची इच्छा करावी ,मुमुक्षेची इच्छा म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावे हि तळमळीची इच्छा . मदालसा हि भगवान महादेवांच्या आशीर्वादाने पुन्हा त्याच देहाने अवतरली होती आणि यामागे नागदेवतांचे मागणे होते , व्हावी योगिनी योगमाता ll तेव्हा मदालसेने असा उपदेश केल्यास आश्चर्य वाटावयास नको .पुढे एका आश्रमात जाऊन अलर्क विचारू लागला इथे संत कोठे आहेत ? तेव्हा त्या आश्रमातील ऋषींनी अलर्काला माहूर इथे जायला सांगितले . तिथे शिखरावर दत्त महाराज आहेत आणि त्यांचा महिमा असा आहे कि दर्शनाने भवसागर नष्ट होतो . हे ऐकून अलर्काला आनंद झाला आणि त्याने माहूर येथे प्रस्थान केले . पुढे दत्त महाराज त्याला भेटले आणि त्यांची त्याच्यावर पूर्ण कृपा झाली अशी कथा आहे . श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य @(चपटी डबी .पेटी हा शब्द थोरल्या महाराजांनी दत्त माहात्म्यात वापरला आहे. )
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
❗१५ ऑक्टोबर❗ ‼️श्री गुरुदेव दत्त ‼ 🌹प्रवचनाचा विषय🌹 🟪🟥🟪लीन माणसाला भगवंत लवकर साधेल.🟪🟥🟪 🔸️नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे. परमेश्वराला अनन्यशरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे. पुष्कळ वेळा, आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो, आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते.🔸️ 🔹️संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये; किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे.🔹️ 💠आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग,एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते.💠 ❄एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्याने, भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे. त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे.❄ 💮 क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा, क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत. असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित.💮 🛟वागण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी; नको ते टाळावे.🛟 🏵अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही; त्याला फक्त आपली अभिमानवृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो.🏵 ♦जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते. मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे.♦ 🪞आपण स्वतःशी चोवीस तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये.🪞 ⭕आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन, तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे. रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी.⭕ 💢'असावे सर्वांत पण नसावे कोणाचे' अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल. देहाच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते.💢 🌀पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाल भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये.🌀 🔷लोकेषणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत.🔷 🌲#बोधवचन 🌲 अभिमानरहित जावे रामाला शरण । त्यानेच राम आपला होईल जाण ॥ 🌷#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌷 🍁श्री राम जय राम जय जय राम🍁 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 दोन चार रुपये दान करून स्वतः ला दानवीर समजणारे व दान करु नका म्हणणारे यांच्या डोळ्यात अंजन घालणारी* *एक प्रत्यक्ष अनुभवास आलेली खरी गोष्ट* ... गाणगापूर येथील दत्त पादुका मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मंदिरात प्रवेश करणार तोच नेहमी मंदिराच्या कोपऱ्यावर भीक मागणारी एक अंध म्हातारी दिसली. सुरकूतल्या चेहऱ्याने व कृश हाताने ती मंदिराचा दरवाजा चाचपडत होती. भीक मागत ही म्हातारी आज थेट इथपर्यंत आली हा विचार करून मी माझा पाऊच तिला भीक देण्यासाठी उघडला.. मुद्दामच नोटांच्या कप्प्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून चिल्लरच्या कप्प्याकडे हात घातला. त्यातही हाताशी आलेल्या 10 व 5 च्या नाण्याला सोडून सगळ्यात छोटं एक रुपयाचे नाणं काढलं आणि स्वतःला दानशूर माणूस समजून देवाच्या अगदी समोरच तिच्या हातावर ( ज्यात अगोदरच काही नाणे होते) ते नाणं टेकवल. म्हातारीने त्या नाण्याचा स्पर्श होताच "सुखी रहाचा" भरभरून आशीर्वाद दिला. एक रुपयाच्या बदल्यात देवाच्या साक्षीने सकाळी सकाळी "सुखी रहाचा" आशीर्वादाने मिळाल्याने मनोमन खुश होत मी दत्त दर्शनासाठी पुढं सरसावलो... बघतो तर ती म्हातारीही पुढं होत होती. मी म्हटलो दिले की आजीबाई पैसे अजून काय पाहिजे? म्हातारी: देवाला भेटायला निघाले बाळा. मी हसत बोललो: का ग, देवाकडे अजून पैसे मागायचेय का! म्हातारी: नाही रे तोच तर रोज देत असतो तुमच्या सारख्यांच्या हातून. मी तिच्या उत्तराने थबकलो व माझा पूर्वीचा चेस्टेचा सूर बदलून तिला विचारले, मग काय आजी तुला दर्शन घ्यायचे आहे का!! म्हातारी: हसत हसत बोलली मला कुठे काही दिसत रे बाबा की आत जाऊन त्याच वेगळं दर्शन घ्यावं!! तिच्या या उत्तराने आता मी पुरता भांबावलो, दरवाज्याकडे परत वळलो व काहीतरी बोलायचं म्हणून बोललो, चल आज्जी तुला हात धरून देवापाशी घेऊन चालतो. म्हातारी: तू चाललाय ना आत? मी: हो, का ग! म्हातारी: मग माझं येक काम करशील पोरा! मी: ( सांशक होत) बोल काय काम.. म्हातारीने तिचा हात पुढे केला आणी बोलली येवढ देवाला देशील..? *आणि तिने हाताची मुठ हळुवार उघडली, त्यात 10, 5, 2, 1 चे नाणे होते.* *मी: हे देवाला द्यायचे..?* *( तिची परिस्थिती बघून मी आश्चर्याने बोललो)* म्हातारी: हो.* मी: देवाला काय करायचे तुझे पैसे..? म्हातारी: अरे तोच तर मला देतो, मग मी नको त्याला काही द्यायला..??? मी: अग पण देवाला नाई लागत पैसे , तो काय करेल याच, उलटे हे तुझ्याच कामात येतील की. *म्हातारी: माझ्या पुरते तर तो रोज देतोच की, हे त्याच्यासाठीचे आहे त्याच्या पैश्याच काय करायचं हे त्याच तो जाणे, तू टाक हे पेटीत जा...* *एवढं बोलून ती अंध म्हातारी तिच्या रोजच्या जागेकडे परत निघाली देखील, निष्कामपणे देवाकडे काहीही न मागता, देवाची झोळी भरून...* *मी म्हातारीच्या खऱ्या औदर्याने भारावलेल्या अवस्थेत न कळत दत्त पादुकांपुढे पुढे उभा ठाकलो.* म्हातारीने हातात टेकवले सर्व नाणे दानपेटीत रीते केले आणि रीत्या मनाने व रीकाम्या हाताने मंदिराला प्रदक्षणा मारून संगमाकडे परत निघालो... परततांना पुढे मंदिराच्या कोपऱ्यावर तीच अंध म्हातारी तिच्या नेहमीच्या जागेवर बसलेली दिसली. अगदी प्रसन्न... स्वतः शी हसत, काही तरी बडबडतांना... ( ती हातात नुकत्याच कुणीतरी दिलेल्या 50 च्या नोटेला चाचपड, हसत काहीतरी पुटपुटत होती..) कुतूहलापोटी मी ती काय पुटपुटतेय हे ऐकण्याचा प्रयत्न केला... *म्हातारी:देवा तुला बी जरा दम नाही बाबा, लगेच पैसे परत* *पाठवले बी, मला काय करायचे रोज येवडे...* *थोड्यावेळापूर्वी एक रूपयाच नाणं टेकवणारा व्यवहारी माणूस मी परत एकदा निशब्द झालो,* एकदम हरवलेला.... *कधी त्या म्हातारीकडे बघत होतो तर कधी दूर गाभाऱ्यात बसलेल्या, न दिसणाऱ्या त्या दत्ताकडे...* *कळतच नव्हत कोण मोठं?* *रोज न चुकता या दीन दुबळ्यांची काळजी वाहणारा तो परमपिता परमेश्वर की श्रद्धा व विश्वासाने त्या देवाचीही झोळी भरणारी ती अंध म्हातारी...* *!!श्रीपाद श्री वल्लभ !!* *!!श्री नृसिंह सरस्वती !!*
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
ऑक्टोबर❗ ‼श्री गुरुदेव दत्त‼ 🌹प्रवचनाचा विषय🌹 🟪🟪परमात्म्याचे प्रियत्व आले की जनप्रियत्व येते.🟪🟪 ♦परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ति द्याव्यात, असे काही माणसांना वाटते, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावे अशी इच्छा का असावी❓ देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का❓♦ 🔸️शक्ति वापरण्याचे सामर्थ्य आपल्याला आले तर परमात्मा कदाचित् ती देईलही.🔸️ 🔹लहानाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग❓🔹 ⭕लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते; पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही, असेही म्हणता❗तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा❓⭕ 🏵तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना❓मग जनांचा राजा परमात्मा, त्याचे प्रियत्व संपादन करा,म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल.🏵 💠तुम्हाला लोक वाईट दिसतात, पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा म्हणजे कुणीही वाईट दिसणार नाही.💠 🛟लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे,पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात.तुम्हीही अशी भावना का करीत नाही की, परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो❓ ही भावना जो जो जास्त दृढ होईल, तो तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे.🛟 💮आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हाती आहे, तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार.💮 🌀आपण सात्त्विक कृत्ये करतो, पण त्यांचा अभिमान बाळगतो. सात्त्विक कृत्ये चांगली खरी,पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट.एक वेळ वाईट कृत्ये परवडली; केव्हा तरी त्यांचा पश्चात्ताप होऊन मुक्तता तरी होईल.पण सात्त्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार❓🌀 ❄मी आप्तइष्टांना मदत केली, आणि आप्तइष्ट म्हणू लागले, 'यात याने काय केले❓परमात्म्याने त्याला दिले म्हणून त्याने मदत केली !' हे ऐकून मला वाईट वाटते❗ इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला, आणि मी मात्र 'मी दिले' असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो❗ परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिले, हीच सत्य स्थिती असताना मला वाईट वाटण्याचे काय कारण❓म्हणून, परमात्म्याच्या इच्छेने सर्व काही घडते आहे ही भावना ठेवावी.❄ 💢आपण परमात्म्याजवळ मागावे की, "तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस, माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे."💢 🌲#बोधवचन :आपले जीवन देवाच्या हाती आहे, आणि देव नामाच्या स्वाधीन आहे.🌲 🌸🌸#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌸🌸 🌷श्री राम जय राम जय जय राम🌷 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿 गेलो आणि देवासमोर जाताच मांडी ठोकून बसलो . काढली वही बॅगेतून . बापू म्हणाले ,अहो आचार्य ,काय करताय ? म्हणालो अहो ,मला येताना दोनशे चौतीस जणांनी सांगितले आहे कि आमचा नमस्कार सांगा . मी सांगतोय महाराजांना . वाचता वाचता दम लागला इतकी नाव होती ,बापूंसहित अनेकांनी हे पाहून डोक्याला हात लावला . प्रसादालयात गेलो आणि ताट समोर ठेवताच हाती फोन घेतला ,समोरच्या रांगेतील काही जण, हा काय प्रकार ? या आविर्भावात पाहू लागले . त्यांना उद्देशून म्हणालो ,अहो प्रसादाच्या ताटाचा फोटो फेसबुकवर पाठवायचा आहे . तसं शास्त्र असत . दोनदा रांग लाऊन तट्ट होत मी बाहेर आलो . तितक्यात एक प्रसिद्ध व्यक्ती मला दिसली ,धावत जाऊन त्यांना गाठले आणि बकोटी पकडून म्हणालो दादा ,एक सेल्फी ,प्लिज नाही म्हणू नका . अगदी नाईलाजाने त्यांनी हो म्हटले . सेल्फी काढताना म्हणालो ,अहो दोन बोटं दाखवा कि ,त्यांनी विचारले का हो ? यावर मी म्हणालो ,शास्त्र असतंय तस ,अगदी वैतागून त्यांनी बोटे दाखवली आणि कृतकृत्य होत मी सेल्फी घेतली . जरा घाटावर विसावलो तो समोर एक बोट दिसली ,तिथे फलक होता --नौका विहार . म्हटलं ,फोटो तो बनता हि है l पायऱ्या उतरून पुढे जात मी दोघांना पकडत म्हणालो ,मी बोटीत बसताना एक फोटो काढा . हे ऐकून नौका हाकणारा मनुष्य म्हणाला ,अहो ,एव्हढ्यात नाही जाणार . मी म्हणालो मला जायचं नाहीये ,फक्त बोटीत टेकतांना फोटो हावाय .--- काय माणसं असतात ? अशा आविर्भावात त्याने पाहिलं मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी फोटोसेशन उरकले . आसपास काय काय प्रसिद्ध आहे ? पुजारी काकांना विचारताच ते म्हणाले ,अरे वाह ,अहो आचार्य या खेपेस दौरा मोठा दिसतोय ,त्यांना थांबवत म्हणालो ,अहो काका ,मला फक्त माहिती द्यायची आहे ,मी उद्या लगेच निघणार आहे . एक छान पोस्ट तयार होत असल्याच्या आनंदात मी निद्राधीन झालो . उद्या सकाळी माझी पोस्ट पहालच ,लाईक करायला विसरू नका ---श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य
🙏श्री स्वामी समर्थ📿 - ( ~3Lಾ ( ~3Lಾ - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐 भक्ती आत्मसमाधान देते ..फक्त उपासनेची पथ्ये पाळा... आपली उपासना अत्यंत गुप्त ठेवावी.स्वत:ही, आपण केवढी उपासना करतो याचा अभिमान बाळगू नये. उपासना ही देवापाशी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. तोआपला आत्यंतिक आनंद असतो.उपासनेचे कष्ट वाटू नयेत तर उपासनेची गोडी लागावी.ती अर्थाकडे लक्ष ठेवून केली तर अधिक गोड वाटू लागते. उपासनेचे फळ मिळेल,ऐहिक भरभराट होईल,दु:खे नाहीशी होतील अशा व्यावहारिक अपेक्षा ठेवू नयेत कारण बरीचशी उपासना पूर्वकर्मांचे दोष नाहीसे करण्यासाठी खर्च होते.कर्ज फिटल्याशिवाय शिल्लक कशी पडेल! त्याचा हिशेब "तो" ठेवेल. *उपासना वाढवाविशी वाटू लागली,डोळे भरुन येऊ लागले,कंठ दाटून येऊ लागला,शुभ स्वप्ने पडू लागली,दैवी अनुभव येऊ लागले,निर्भयता वाढू लागली की ओळखावे आपली उपासना योग्य दिशेने चालली आहे.* पुढे पुढे संसारसुखाच्या अपेक्षा नाहीशा होऊ लागतात.व्याकूळ होऊन उपासक सात्त्विक रागाने देवाला विचारतो,....... मुका मुक्तेश्वर बोलविला!पांगुळा कूर्मदास चालविला! आंधळा सूरदास डोळस केला! मजविषयी तुजला काय झाले! येथोनी आता कृपा करा! आपली माया आपण आवरा! ते ऐश्र्वर्य न रुचे आम्हा पामरा!चरणी थारा देईजे! अशी अवस्था उपासनेची पराकोटीची उच्च उंची दर्शविते.ती येणे उपासकाच्या व्याकूळतेवर अवलंबून असते.पूर्वकर्मांच्या ओझ्यावर अवलंबून असते.निरपेक्ष प्रेमाने प्रखर उपासना करीत रहाणे हेच उत्तम. उपासना कोणत्या देवाची करावी हा प्रश्नच पडू नये.शक्ती एकच आहे.ती विद्युलतेसारखी आहे.वीज गिझरमधून गेली तर ती महाकालीचे रूप असते आणि AC मधून गेली तर शांतादुर्गा असते. आपल्याला भावेल त्या देवतेची उपासना करावी.कोणाला दत्तमहा- राजांचे संन्यासी विरक्त रूप भावते तर कोणाला जगदंबेची भक्त-वत्सलता भावते.कोणाला मर्यादापुरुषोत्तम रामप्रभूंचा संयम भावतो तर कोणाला मारुतीरायाची दास्यभक्ती भावते.म्हणून देवादेवात भेदभाव करू नये. कोणताही खाद्यपदार्थ क्षुधाशांती करतोच तसे कोणत्याही देवतेची भक्ती आत्मतृप्ती करतेच. आकाश पतितं तोयं ।यथा गच्छती सागरं। सर्व देव नमस्कारं ।केशवं प्रती गच्छती।।
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - 06 06 - ShareChat
श्रीदत्तात्रेय षोडशावतार महाराष्ट्राची संतपरंपरा, संतवाड्:मय यातून नेहमीच भगवंताच्या विविध रूपांचे दर्शन घडत आले आहे. श्रीदत्तात्रेयांचे उपासक दासोपंत यांचे सहित्य सुद्धा अपवाद नाही. अंबेजोगाईला दासोपंतांनी दत्तमंदिर बांधून अनेक साहित्य रचले. त्यातील एक दत्तात्रेयांचे सोळा अवतार. पुढे प. प. थोरले महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी दासोपंतांच्या साहित्याचा सोप्या भाषेत अनुवाद केला. अनेक संप्रदायांनी श्रीदत्तात्रेयांच्या भक्तीचा प्रचार अणि प्रसार केला. शैव, वैष्णव, शाक्त यांच्यातील अंतर वाढू लागले, तेव्हा श्रीदत्तसंप्रदायाने धर्म अखंड ठेवून अधिक समृध्द केला. श्रीदत्तात्रेयांची त्रिमूर्ती उपासना ही त्याचेच प्रतीक आहे. अत्रि-अनुसया पुत्र म्हणून श्रीदत्तात्रेय हे सर्वश्रुत आहेत, त्यानंतरच्या काळात श्रीदत्तात्रेयांचे सोळा अवतार हे श्रीदत्तात्रयांचे अस्तित्व अणि महत्व दर्शवितात. *दत्तात्रेयांचे सोळा अवतार:* १) अत्रिअनुसयेने पुत्र प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली, त्यावर भगवंत प्रसन्न होऊन कार्तिक शुध्द १५ ला प्रकटले, योगमार्गचा प्रसार केल्यामुळे दत्तात्रेयांचा हा अवतार "योगिराज" म्हणून वर्णिला आहे. २) अत्रिऋषींच्या तपश्चर्येला वरदान म्हणून 'अत्रिवरद' नावाने त्रिमूर्ती रुपात योगिराज कृष्ण प्रतिपदेस प्रकटले. ३) अत्रिवरदाने अत्रिऋषींना वरदान विचारले असता, तुमच्या सारखाच पुत्र असावा असे वरदान मागताच भगवंत बालरुपात कार्तिक कृष्ण द्वितीयेला प्रकटले. ४) अत्रिऋषींच्या शरीरातील कालाग्नीचे शमन करण्यासाठी शीतल रुप घेऊन मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला प्रकटले म्हणून 'कालाग्निशमन'. ५) कालाग्निशमन बाल रुपाचा त्याग करुन, सर्व योगीजनांना 'योगिजनवल्लभ' योगीरुपात मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला अवतरले. ६) दत्तात्रेयांनी लोक कल्याणासाठी पौष शुध्द पौर्णिमेला लिलाविश्वंभर अवतार घेऊन आपल्या अद्भुत लिलांनी कल्याण केले. ७) कुमार रुपात माघ शुध्द १५ ला अवतारित होऊन अनेक ऋषी मुनींनच्या प्राप्त सिध्दींचे गर्वहरण करुन योगदिक्षा प्रदान केली, तो 'सिध्दराज' अवतार. ८) दत्तात्रेयांनी फाल्गुन शुद्ध दशमीला ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी 'ज्ञानसागर' नावाने अवतार घेतला ९) दत्तात्रेयांनी 'विश्वंभरावधूत' या नावाचा अवतार घेवून चैत्र शुद्ध पौर्णिमेला बीजमंत्रांचा उपदेश केला. १०) भक्ति अणि श्रध्दा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी वैशाख शुद्ध चतुर्दशीला 'मायामुक्तावधूत' अवतार घेतला. ११) विपरीत परस्थितीत परीक्षा घेवून, योग्य संदेश देण्यासाठी दत्तात्रेयांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला योगमाया रुपात 'मायायुक्तावधूत' अवतार घेतला. १२) योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी आषाढ शुध्द १५ ला 'आदिगुरु' रुपात अवतार धारण केला. १३) श्रावण शुद्ध अष्टमीला शिवरुपात दत्तात्रेय प्रगटले, तो 'शिवगुरु नावाचा अवतार. या अवतारात वर्णाश्रमाचे थोतांड अणि वैराग्ययुक्त पंचमाश्रमाचा उपदेश केला. १४) सर्वांना अनुग्रह करण्यासाठी दत्तात्रेयांचा 'देवदेवेश्वर' नावाचा अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला प्रकटला १५) दत्तात्रेयांचा 'दिगंबर' अवतारात यदुराजास आपल्या २४ गुरुंपासून प्राप्त ज्ञानाचे अवलोकन करण्यासाठी आश्विन शुद्ध पौर्णिमेला अवतरला १६) कार्तिक शुद्ध पौर्णिमेला 'श्रीकृष्णश्यामकमललोचन' रुपात भक्तांना एकच भक्तिमार्गाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. सोळा अवतारांचा उत्सव संपूर्ण हिंदुस्थानात केवळ अंबेजोगाईला साजरा होतो. दासोपंतांच्या अंबेजोगाई येथील "देवघर" या मंदिरात आजही सोळा दत्त अवतारांच्या मूर्ती दर्शनास उपलब्ध आहेत. त्रिलोकरचना अणि आदितत्वयुक्त १६ कलांनी परिपूर्ण असा पौरुष अर्थात मनुष्य शरीराचा भगवंताने स्वीकार केला. *जगृहे पौरुषं रूपं भगवान् महादादिभि: |* *सम्भूतं षोड़शकलमादौ लोकसिसृक्षया ||* (श्रीमद्भागवतम् १.३.१) इतकेच नाही तर संपूर्ण जगताला सुध्दा हिंदु धर्म षोडशकला युक्त मानतो, *षोडशकलं वा इदं सर्वं* (शतपथ ब्राम्हण) श्रीदत्तात्रेयांच्या सोळा अवतारांचे साम्य अणि सोळा कला यात साम्यता आढळते, याबाबत दासोपंत अथवा प. प. थोरले स्वामींमहाराजांनी कुठेच उल्लेख केलेला नाही, पण तसा संकेत अप्रत्यक्षपणे प्राप्त होतो. श्री दत्तगुरु अवधूत आहेत सर्वांचे हितकर्ते, क्षमाशील, योगी अणि कृपाळू आहेत. अवधूत शब्दाचा अर्थ 'अ' अविनाशी, 'व' वरेण्य अर्थात सर्वश्रेष्ठ, 'धू' पवित्र, निर्मळ, 'त' "तत् त्वं असि" परब्रम्ह. *अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त* #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - फरूंचे सोळा अवतार அபச বরানা্যিযণন নানতত चागिजनचल সিনে TT TIITT  ulr mums  Ldana বমন फरूंचे सोळा अवतार அபச বরানা্যিযণন নানতত चागिजनचल সিনে TT TIITT  ulr mums  Ldana বমন - ShareChat
काय असते गिरनार वारी....? 🙏 नेहमी गिरनार जायचे म्हटले की काही जण म्हणतात काय वेड लागले की काय दर 2 महिने झाले की गिरनारला पळतोस!!!!!... हो आमच्या भाषेत वेडच ते आणि आम्ही तेच वेडे आहोत... नाहीतर तुम्ही शहाणे तिथे जालच कश्याला? बरोबर ना?कारण...(वेळेला वेडेच उपयोगी येतात आणि शहाणे पळून जातात) काय मिळतं तिथे सारखं जाऊन? काम धंदे सोडून पळतात तिकडे ते... अस काय आहे गिरनार? अहो काम धंदे सोडून कोणी जात नाही तर आमच्या गिरनारी साठी वेळ काढून जातो दर्शनासाठी... जिथे प्रत्येक पायरी चढतांना चांगली, वाईट केलेली कर्म आठवतात ना ते आहे गिरनार... तिथे गेल्यावर आठवतं व चांगली बुद्धी जागृत होते ते आहे गिरनार... जीवनातली सगळी दुःख विसरून, रोजची घरातली,बाहेरची कटकट विसरून 5 दिवस जो सुखाने जगतो ना, जिथे सुख,समाधान मिळतं ना ते आहे गिरनार... भक्तीमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ना ते आहे गिरनार... श्रीमंत,गरीब जिथे एकत्र येतात ना ते आहे गिरनार... सगळ्या सुख दुःखांची जिथे बेरीज वजाबाकी करून सुद्धा शिल्लक काही राहत नसेल, तरी सुध्दा काहीतरी मिळतं ते आहे गिरनार.... आरोग्याच्या तक्रारी, नोकरीत बढती, व्यवसायात वाढ, मुलांची शिक्षणं, लग्न, घरदार सगळं काही मनासारखे होते जिथे गेल्यावर ते म्हणजे गिरनार.... ढोपरं दुखतात,दम लागतो, तरी सुद्धा एक एक पायरी चढून जाण्याची इच्छाशक्ती जिथे वाढते, ते म्हणजे गिरनार... जिथे भल्या भल्यांची परीक्षा घेतली जाते, अहंकार जिथे गळून पडतो, व मग अक्कल ठिकाणावर येते अपराधाची केल्याची जिथे जाणीव होते ते गिरनार... असे हे आमच्या गिरनारी महाराजांचे गिरनार... आणि तुम्ही म्हणता काय मिळतं तिथे सारखं सारखं जाऊन गिरनार... माहेर वाशीण जशी माहेराला येते व तिला जो आनंद होतो ना आल्यावर व निघतांना पाय निघत नाही, तसच आमचं हे गिरनार... हे सर्व वाचून ज्याचे मन म्हणते बरोबर आहे, व ज्याच्या डोळ्यात आपसूक पाणी येते ना ते हे गिरनार... हे सर्व तुम्हाला नाही समजणार कारण तुम्ही तर या संसाराच्या मोह-माया पासून सुटुच शकत नाही,आणि महाराजांच्या जवळ जाण्याची बुद्धीच होणार नाही, तो पर्यंत समजणार नाही काय आहे गिरनार... तर असे आहे गिरनार... 🌺🙏जय गिरनारी🙏🌺 🌼🙏अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🌼 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - 0 0 9 ~51 091 e 0 0 9 ~51 091 e - ShareChat